महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील तलावाचे कुलगुरु यांच्या हस्ते जलपूजन

जल संवर्धनासाठी प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक – कुलगुरु लेफ्ट जनरल माधुरी कानिटकर

नाशिक : जल संवर्धनासाठी प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ परिसारातील तलावाचे कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांच्या हस्ते जलपुजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यापीठाचे प्रती-कुलगुरु डॉ मिलिंद निकुंभ, लेफ्टनन्ट जनरल राजीव कानिटकर (निवृत्त), कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ, वित्त व लेखाधिकारी एन व्ही कळसकर आदी अधिकारी उपस्थित होते.

कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, पाण्याचे स्त्रोत हे मर्यादित आहेत. पाण्याचा वापर योग्य पध्दतीने करणे आवश्यक आहे. शेती, औद्योगिक क्षेत्र, पिण्यासाठी तसेच विविध कामात पाण्याची मोठया प्रमाणात आवश्यकता असते. पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत मोजकेच असल्याचे पाण्याचे जतन व संवर्धन करणे आवश्यक आहे. असे त्यांनी सांगितले.

Advertisement

प्रती-कुलगुरु डॉ मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, भूतलावर जलसाठा सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे आपण सर्वांनी पाण्याचा जपून वापर केला पाहिजे. विद्यापीठाच्या आवारात असणाऱ्या झाडांना वर्षभर पाणी पुरते. तसेच या तलावामुळे विद्यापीठ परिसरात उन्हाळयात देखील हिरवेगार वातावरण असते. असे त्यांनी सांगितले.

यावेळी विद्यापीठातील जलसाठयाचे कुलगुरु यांच्या हस्ते पूजन करुन श्रीफळ अर्पण करण्यात आले. याप्रसंगी विद्यापीठ हरित कक्षाचे प्रमुख डॉ सुनिल फुगारे, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ देवेंद्र पाटील, डॉ मृणाल पाटील, डॉ नितीन कावेडे, महेंद्र कोठावदे, अॅड संदीप कुलकर्णी, संजय मराठे, संदीप राठोड, मधुकर भिसे, राजेंद्र शहाणे, संतोष कोकाटे, बाळासाहेब पेंढारकर, वाय जी पाटील, डॉ अनुश्री नेटके, डॉ वैशाली गंभीरे, प्रशांत पवार, अनंता शिंदे, सचिन बोरसे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमासाठी निलेश ओहोळ, नंदकुमार सोनजे, श्रीरंग घोडके यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page