“श्रेष्ठपणे कर्तव्य निभावणे हेच गीतेतील सर्वात मोठे ज्ञान” – मंत्री मंगल प्रभात लोढा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात रोजगार मेळाव्यास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नागपूर : “आपल्याला दिलेले कोणतेही काम योग्य निष्ठेने, कौशल्याने आणि समर्पणाने करणे हेच भगवद्गीतेतील सर्वात मोठे ज्ञान आहे,” असे प्रेरणादायी विचार राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे माननीय मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केले.

ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. विद्यापीठाचा रोजगार व प्रशिक्षण विभाग, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आणि मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा दीक्षांत सभागृह, छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय परिसर, महाराज बाग चौक येथे संपन्न झाला.

Advertisement
“The greatest wisdom in the Gita is to perform one's duty in the best possible way” – Minister Mangal Prabhat Lodha

यावेळी विविध कंपन्यांनी आपल्या भरती प्रक्रिया राबवल्या आणि शेकडो विद्यार्थ्यांनी या संधींचा लाभ घेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमात मंत्री लोढा यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना उद्देशून उद्योजकतेचे महत्त्व, नवनवीन कौशल्यांचा विकास, आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने पुढे जाण्याची गरज अधोरेखित केली.

“The greatest wisdom in the Gita is to perform one's duty in the best possible way” – Minister Mangal Prabhat Lodha

रोजगाराच्या संधी निर्माण करताना शिक्षण संस्थांनी औद्योगिक क्षेत्राशी सुसंवाद साधून, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण व मार्गदर्शन देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

हा रोजगार मेळावा विद्यार्थ्यांसाठी एक प्रभावी व्यासपीठ ठरला असून, भविष्यात अशा उपक्रमांची संख्या वाढवण्यात येईल, असे आयोजकांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *