कुलगुरू डॉ प्रकाश महानवर यांनी वाढदिवसानिमित्त 25 हजार रुपयांची 300 फळझाडांची सोलापूर विद्यापीठात केली लागवड

सोलापूर विद्यापीठात 5 वर्षात 5 लाख वृक्ष लागवडीचा संकल्प

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा डॉ प्रकाश महानवर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सहकाऱ्यांसमवेत विद्यापीठाच्या 482 एकर परिसरात 25 हजार रुपयांची 300 फळझाडांची लागवड केली. त्यांच्या 5 वर्षाच्या कार्यकाळात 5 लाख वृक्ष लागवड करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. आतापर्यंत विद्यापीठ परिसरात 60 हजारहून अधिक विविध झाडांची लागवड करण्यात आली आहे.

VC Dr. Prakash Mahanwar planted trees at Solapur University on his birthday
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा डॉ प्रकाश महानवर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सहकाऱ्यांसमवेत विद्यापीठाच्या 482 एकर परिसरात 25 हजार रुपयांची 300 फळझाडांची लागवड केली. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ अतुल लकडे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ राजेंद्र वडजे, वित्त व लेखाधिकारी महादेव खराडे, परीक्षा विभागाचे संचालक डॉ श्रीकांत अंधारे, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुनील थोरात व अन्य.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त कुलगुरू प्रा प्रकाश महानवर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त 25 हजार रुपयांची पाच ते सहा फूट उंचीची 300 फळझाडे खरेदी करून त्या झाडांची विद्यापीठाच्या 482 एकर परिसरात लागवड केली. यामध्ये प्रामुख्याने केशर आंबा, जांभूळ, नारळ, चिकू या झाडांचा समावेश आहे. वृक्षारोपण करण्याबरोबरच वृक्ष संवर्धन करण्यासाठी देखील विद्यापीठ प्रशासनाच्यावतीने आवश्यक ती काळजी घेण्यात येत आहे. बुधवारी या 300 फळझाडांची लागवड करण्यात आली. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ अतुल लकडे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ राजेंद्र वडजे, वित्त व लेखाधिकारी महादेव खराडे, परीक्षा विभागाचे संचालक डॉ श्रीकांत अंधारे, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुनील थोरात यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement

यावेळी बोलताना कुलगुरू डॉ महानवर म्हणाले की, आधुनिकीकरणामुळे वातावरणात फार मोठे बदल होत आहे. तापमानात मोठी वाढ होत आहे. मोफत मिळणाऱ्या ऑक्सिजनसाठी मोठ्या प्रमाणात आज वृक्ष लागवड व संवर्धन करणे आवश्यक आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून विद्यापीठाच्या 482 एकर परिसरात पाच वर्षाच्या कार्यकाळात पाच लाख वृक्षलागवड करण्याचा संकल्प केला आहे. यासाठी विद्यापीठास सर्व स्तरातून सहकार्य मिळत आहे. अनेकांनी विद्यापीठास मोफत विविध रोपे दिली आहेत. आता जून महिन्यात वृक्षारोपण करण्याचा योग्य काळ आहे. त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणात विद्यापीठाकडून वृक्षारोपण करण्यात येत असल्याचे कुलगुरू प्रा महानवर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *