कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘जागतिक सायकल दिना’निमित्त सायकल रॅलीचे आयोजन
प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीस प्रारंभ
जळगाव, ३ जून २०२५ (प्रतिनिधी):
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे जागतिक सायकल दिनानिमित्त आज मंगळवार, ३ जून २०२५ रोजी सकाळी ७ वाजता सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या रॅलीस सुरुवात झाली.
या प्रसंगी प्रा. इंगळे यांनी पर्यावरण व आरोग्य संवर्धनासाठी सायकलच्या वापराचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, “प्रदूषण कमी करण्यासाठी व निसर्गाचे रक्षण करण्यासाठी सायकलिंग हा सर्वोत्तम पर्याय आहे. सायकल चालवल्याने शरीराच्या सर्व स्नायुंचा व्यायाम होतो व आरोग्य टिकून राहते.

कार्यक्रमात रासेयो संचालक प्रा. सचिन नांद्रे, प्रा. किशोर पवार, प्रा. दीपक दलाल, प्रा. मनोज पाटील, तसेच जळगाव सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष निलेश चौधरी, धुळे सायकल मार्टचे समीर रोकडे, तसेच अनेक मान्यवर आणि सायकलप्रेमी सहभागी झाले होते.
रॅलीत सहभागी झालेल्या शेकडो सायकलपटूंमध्ये राम घोरपडे, रूपेश भाऊ महाजन, डॉ. अनघा चोपडे, समीर रोकडे, स्वप्निल मराठे, मथुरा गाडे, अजय पाटील, डॉ. सुयोग चव्हाण, दीपमाला काळे, गणेश महाजन, अभिषेक सिंग, चंद्रकांत अमोडकर यांच्यासह अनेकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सूत्रसंचालन सुभाष पवार यांनी केले.
रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा कक्षाचे कक्ष अधिकारी शरद पाटील, शिवाजी पाटील, कैलास औटी, विजय बिऱ्हाडे, विलास पाटील, सौरभ साबळे व वैभव बाविस्कर यांनी विशेष परिश्रम घेतले.
ही सायकल रॅली पर्यावरण संरक्षण, आरोग्यवर्धन आणि जनजागृतीचा संदेश देणारी ठरली