कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयात त्रिदिवसीय राष्ट्रीय बुद्धिस्ट परिषदेचे आयोजन

रामटेक : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय आणि इंडियन सोसायटी फॉर बुद्धिस्ट स्टडीज्, जम्मू यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय बुद्धिस्ट परिषदेचे आयोजन रामटेक येथे दि 14, 15 व 16 सप्टेंबर 2024 रोजी करण्यात आले आहे. बुद्ध वाङ्मय, तत्त्वज्ञान यावर मंथन करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील बुद्ध साहित्य, तत्त्वज्ञान यावर मंथन व्हावे हे ही या परिषदेचे प्रयोजन आहे.रामटेक, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, राष्ट्रीय बुद्धिस्ट परिषद, कुलगुरू प्रो हरेराम त्रिपाठी, कुलगुरू प्रो मुरली मनोहर पाठक, सांस्कृतिक कट्टा,

या परिषदेसाठी, भारतीय सामाजिक विज्ञान अनुसंधान परिषद, दिल्ली, भारतीय दार्शनिक अनुसंधान परिषद, दिल्ली, भारतीय इतिहास अनुसंधान परिषद्, दिल्ली तसेच केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय, दिल्ली यांच्याद्वारे आर्थिक अनुदान प्राप्त झाले आहे. कुलगुरू प्रो हरेराम त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या परिषदेचे संयोजक प्रो प्रसाद गोखले, संचालक, विद्यापीठ नियोजन विकास मंडळ आहेत. या परिषदेचे उद्घाटन उद्या शनिवार, दि 14 सप्टेंबर 2024 रोजी डॉ कमलाकर तोतडे सभागृह, रामटेक येथे संपन्न होणार आहे.

या उद्‌घाटन समारोहाचे अध्यक्षस्थान कुलगुरू प्रो हरेराम त्रिपाठी भूषविणार आहेत. प्रमुख अतिथी या नात्याने 24 व्या वार्षिक बुद्धिस्ट परिषदेचे अध्यक्ष प्रो मुरली मनोहर पाठक, कुलगुरू, लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ, नवी दिल्ली प्रौ अरविंद जामखेडकर, कुलपती, जे जे स्कूल ऑफ आर्टस, मुंबई, प्रो बैद्यनाथ लाम, कुलगुरू, सांची युनिव्र्व्हसिटी ऑफ बुद्धिस्ट अॅड इंडिक स्टडीज, सांची विशेष अतिथी या नात्याने उपस्थित राहणार आहे. राष्ट्रीय बुद्धिस्ट परिषदेत भारतभरातून 200 हून अधिक संशोधक, विद्वान् सहभागी होणार कुलगुरू प्रो हरेराम त्रिपाठी म्हणाले, संपूर्ण भारतातून राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्तराचे बौद्ध दर्शन व भारतीय दर्शनाचे विद्वान् तीन दिवस या परिषेत शोधपत्रवाचन तसेच शोधसंवादात सहभागी होणार आहेत.

Advertisement

या परिषदेतील या शोधसंवादाद्वारे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या अनुषंगाने मौलिक विचार मांडले जातील. या परिषदेत भारतातील 10 हून अधिक कुलगुरू उपस्थित राहणार आहेत. याशिवाय संपूर्ण भारतभरातून 200 हून अधिक प्राध्यापक, विद्वान्, कुलगुरू आणि विद्यार्थी भारतीय दर्शन आणि बौद्ध तत्त्वज्ञान यावर संशोधन निबंध प्रस्तुत करतील. या परिषदेद्वारे नवीन शैक्षणिक धोरणाचा विकास तर होईलच पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील 2047 च्या विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यास विश्वविद्यालय उपोद्दलक कार्य करेल असा विश्वासही कुलगुरू प्रो त्रिपाठी यांनी व्यक्त केला.

विशेष अतिथी या नात्याने प्रो सी जी विजयकुमार, कुलगुरू, महर्षी पाणिनी संस्कृत तथा वैदिक विश्वविद्यालय, उज्जैन, सारस्वत अतिथी या नात्याने प्रो महेश देवकर, विभाग प्रमुख, पाली व बुद्धिस्ट स्टडी सेंटर, पुणे विद्यापीठ, पुणे उपस्थित राहतील. इंडियन सोसायटी फॉर बुद्धिस्ट स्टडीज् चे अध्एयक्ष प्रो सत्यप्रकाश शर्मा, प्रो उदई चंद्र जैन, विश्वस्त, प्रो रत्ना बासू, निवृत्त प्रोफेसर, कलकत्ता विद्यापीठ, इंडियन सोसायटी फॉर बुद्धिस्ट स्टडीज येचे उपाध्यक्ष प्रो ललितकुमार गुप्ता, सचिव प्रो सरस्वती मुटसडी, कोषाध्यक्ष डॉ सुरेश कुमार, संयुक्त सचिव प्रो अंबालिका सूद जेकब उपस्थित राहतील.

विश्वविद्यालयाचे कुलसचिव प्रो कृष्णकुमार पाण्डेय आणि सदर परिषदेचे स्थानिक सचिव प्रो प्रसाद गोखले विशेषत्वाने उपस्थित राहतील. विश्वविद्यालयात येत्या तीन दिवसात पाली भाषा व वाङ्मय, बुद्धिस्ट संस्कृत भाषा व साहित्य, अपभ्रंश साहित्यातील बुद्धिझम, केंद्रीय आणि पूर्वआशियातील भाषा व साहित्य, बुद्धिझमचा इतिहास, बौद्ध तत्त्वज्ञान, तौलनिम बुद्धिझम, महाराष्ट्रातील बुद्धिझम, बुद्धिझम आणि न्युरो सायन्स इ अनेक विषयांवर संपूर्ण भारतातील 100 हून अधिक विद्वान्, प्राध्यापक, संशोधक शोधनिबंध सादर करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page