कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘एक पेड माँ के नाम २.०’ उपक्रमांतर्गत वृक्ष लागवड
७१ वृक्षांची लागवड; पर्यावरण दिन व मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन २०२५ निमित्त आणि महाराष्ट्र शासनाच्या ‘दहा कोटी वृक्ष लागवड अभियान’ अनुषंगाने, तसेच मा. ना. चंद्रकांतदादा पाटील (मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण विभाग) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘एक पेड माँ के नाम २.०’ या विशेष उपक्रमाअंतर्गत वृक्ष लागवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात आंबा, वड, चिंच, पिंपळ, नीम अशा पर्यावरणपूरक ७१ वृक्षांची लागवड उत्साहात करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. योगेश पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, वित्त व लेखा अधिकारी सीए. रवींद्र पाटील, तसेच क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली.

यावेळी प्र. उद्यान अधीक्षक अश्विनी पाटील, धनदाई महाविद्यालयाचे प्रा. शैलेश पाटील, रासेयो कक्ष अधिकारी शरद पाटील, जगदीश शिवदे, शिवाजी पाटील, चिंतामण सोनवणे, सेवानिवृत्त कर्मचारी श्री. आर.टी. बाविस्कर, कैलास औटी, दै. वेतनिक सौरभ साबळे, वैभव बाविस्कर, अधिकार पाटील, आकाश भामरे, तसेच रासेयोचे स्वयंसेवक विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
हा उपक्रम पर्यावरण संवर्धनासोबतच मातृप्रेम व्यक्त करण्याचा एक अभिनव आणि प्रेरणादायी प्रयत्न ठरला आहे.