महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 27 वा वर्धापन दिन समारंभ उत्साहात संपन्न
संशोधकांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करणे गरजेचे – मा. खासदार डॉ. अजित गोपछडे
नाशिक : विद्यार्थी व संशोधकांनी गुणवत्तापूर्ण व दर्जात्मक संशोधन करावे. संशोधकांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करुन नावलौकिक मिळण्यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मा. राज्यसभेचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 27 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प, उपस्थित होत्या समवेत प्रमुख अतिथी म्हणून मा. राज्यसभेचे खासदार तथा विद्यापीठाचे माजी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. अजित गोपछडे, मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, सन्माननीय अतिथी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे प्रशासक डॉ. विंकी रुघवानी, लेफ्ट. जनरल श्री. राजीव कानिटकर, डॉ. रविकिरण जाधव, विद्यापीठाचे होमिओपॅथी विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. राजकुमार पाटील, नर्सिंग विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. श्रीलेखा राजेश, तत्सम विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. वाय प्रविण कुमार, मा. व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. विलास वांगिकर, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी श्री. बोधीकिरण सोनकांबळे, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. देवेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना मा. खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी सांगितले की, सर्वसामान्यांना आरोग्य आणि विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे वैद्यकीय शिक्षण मिळणे गरजेचे आहे. आरोग्य क्षेत्रात संशोधनाला चालना मिळावी याकरीता मा. कुलगुरु महोदयांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेले उपक्रम महत्वपूर्ण आहेत. मा. पंतप्रधान यांच्या ‘होलिस्टिक इंडिया’ ची संकल्पनेला मूर्त रुप देण्यासाठी आपण सर्वांनी हातभार लावणे गरजेचे आहे.
ते पुढे म्हणाले की ‘हेल्थ फॉर ऑल’ मिशनच्या माध्यमातून सर्वांना योग्य आरोग्य सेवा व सुविधा मिळाव्यात यासाठी शासन प्रयत्नशील आहे. ‘गावाकडे चला’ या उपक्रमात ग्रामिण भागातील पायाभूत सुविधांचा विकास करणे ही मूळ संकल्पना आहे, यासाठी कौशल्य उपक्रम व आपले लघुउद्योग ग्रामिण भागात वाढविल्यास रोजगार वाढेल. आर्थिक परिस्थिती सुदृढ होईल. यशप्राप्तीसाठी प्रत्येकाने आपल्या शिक्षण व कौशल्याच्या आधारावर रोडमॅप तयार करुन त्याचा अवलंब करावा. ग्रीन कॅम्पस उपक्रमातून विद्यापीठ परिसराचे पालटलेले रुप हा सर्वांसाठी आदर्श आहे. कामातील शिस्त, वक्तशीरपणा याचा अवलंब केल्यास यशाकडे वाटचाल होईल. संशोधनात्मक कार्य करण्यासाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या उपक्रमात सहभागी व्हावे. विद्यार्थी आणि प्रशासन यातील दुवा म्हणून काम करेल. विद्यापीठाच्या विविध उपक्रमांना खासदार निधीतून दरवर्षी रुपये एक कोटी करुन निधी उपलब्ध करुन देईल असेही त्यांनी सांगितले.

याप्रसंगी अध्यक्षीय मनोगतात मा. कुलगरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, सर्व शाखेतील विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे अधिक लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. विद्यापीठाकडून विविध संशोधन अभ्यासक्रम व उपक्रम राबविण्यात येत आहेत. प्रतिभाशाली व कौशल्यपूर्ण व्यक्तीमत्व घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. विद्यापीठाच्या संशोधन प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून आर्थिक सहाय्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे याव्दारा संशोधन व विद्यार्थी कल्याणाच्या विविध योजनांना अधिक गती मिळेल. आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधनात यश मिळाल्यानंतर विद्यापीठाच्या उपक्रमातून प्रेरणा घेतली असे कार्य करावयाचे आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, विद्यापीठाचा ‘इंटिग्रटेड फॅकल्टी मेडिसिन एज्युकेशन’ हा महत्वाकांशी उपक्रम असून याव्दारे आरोग्य आणि शिक्षण यांच्या एकात्मिक अभ्यासक्रमाव्दारे तो कार्यान्वीत करण्यात येणार आहे. विद्यापीइाचा सेंटर ऑफ एक्सलन्स, चक्र, ई-प्रबोधिनी, नाईस, दिशा, डिजिटल हेल्थ फाऊंडेशन आदी उपक्रमांव्दारे विद्यापीठात संशोधनाला गती मिळेल. सी-डॅक कंपनीव्दारा ऑटोमेशन करुन विद्यापीठ प्रशासन कामकाजाला अधिक गती मिळाली आहे. सुमारे 600 पेक्षा अधिक संलग्नित महाविद्यालयांचे अत्यंत कमी वेळेत इन्सपेक्शन, परीक्षा समाप्तीनंतर दोन आठवडयांच्या आधी निकाल आदी कामे ऑटोमेशनव्दारा करण्यात येत असून अधिक वेगाने कामकाज करण्यासाठी विद्यापीठ भरारी घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विद्यापीठाचे मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी यशाची प्राप्ती करण्यासाठी पायाभूत विचारांची व प्रेरणेची भूमिका महत्वपूर्ण असते. जागतिकस्तरावर नावलौकिक होईल असे संशोधन कार्य विद्यार्थ्यांनी करावे. युवा पिढीने या विद्यापीठाच्या विविध डिजिटल अभ्यासक्रमात सहभागी होऊन कौशल्य व संशोधन आदींची भूमिका विकास करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर समाजसेवेचे व्रत हाती घ्यावे. गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साह आणि जल्लोष वाखानण्याजोगा आहे. मा. कुलगुरु महोदया यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेले विविध उपक्रम विद्यार्थ्यांच्या गुणांना पाठबळ उल्लेखनीय ठरतील. विद्यार्थ्यांचा सहभाग, समरता व योग्य मार्गर्शन आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाठी विद्यापीठ नेहमीच सकारात्मकरित्या प्रयन्तशील असल्याचे त्यांनी सांगितले.
जीवन गौरव पुरस्कारार्थी डॉ. रविकिरण जाधव यांनी मनोगतात सांगितले की, शिक्षण हा विकासाचा पाया आहे. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीचा सामना करुन मी घडलो. तीन दशकांपेक्षा अधिक काळ ज्ञानदानचे कार्य केले असून माझा विद्यापीठाने केलेला सन्मानात मी ऋणी आहे. ‘लोकसेवा हीच ईश्वर सेवा’ हे व्रत धरुन मी काम केले. शिक्षण आणि आरोग्य यासाठी सकारात्मक भावनेने केलेले काम महत्वाचे आहे. गुणवंत विद्यार्थ्यांनी समाजासाठी कोणतेही काम करा ज्याचा सर्वांना उपयोग होईल. माझ्या कार्याची दखल घेऊन केलेले कौतुक आणि सन्मान याचा मला सार्थ अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी लेफ्टनंट जनरल श्री. राजीव कानिटकर यांना विद्यापीठातर्फे ‘लेटर ऑफ ग्रॅटीटयुड’ या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी त्यांना मानचिन्ह, शाल व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. विद्यापीठाच्या ग्रीन कॅम्पसबद्दल उपकुलसचिव डॉ. सुनिल फुगारे यांनी संकल्पना विषद करुन सांगितली.

विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यंानी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनंसपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले.
आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान विद्यापीठातर्फे सन्मान करण्यात येतो. होमिओपॅथी विद्याशाखेतील डॉ. रविकिरण गजानन जाधव यांना सन 2023-2024 करीताचा विद्यापीठ जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी त्यांना मानचिन्ह, शाल व जीवन गौरव पुरस्काराने सन्माने सन्मानित करण्यात आले.
विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये वर्धापन दिनानिमित्त मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाचे सदस्य, विविध मान्यवर आणि विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते 34 गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले तसेच विद्यापीठातर्फे उकृष्ट शिक्षक पुरस्कार, उकृष्ट विद्यार्थी पुरस्कार, राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार आणि विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या सन 2024-2025 मधील उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार नाशिक येथील मोतिवाला होमिओपॅथिक महाविद्यालयाचे शिवानी बाळासाहेब दिघाडे, पुणे येथील टिळक आयुर्वेद महाविद्यालयाचे चेतन सुनिल गंधिले, सांगली येथील श्री. अण्णासाहेब डांगे आयुर्वेद महाविद्यालयाचे नेहा सुधिर तांबिले, जळगाव येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे डॉ. राजेश कोलारकर, पुणे येथील सुमतीभाई शाह आयुर्वेद महाविद्यालयाचे विशाखा प्रशांत कोल्हे, संगमनेर येथील वामनराव इथापे होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालयाचे वैष्णवी विजय बनकर, स्नेहल सुभाष कोळसे, सायली जयराम जाधव, रुचा युवराज राजमाने, मुंबई येथील आयुर्वेद महाविद्यालयाचे शुभम शिवप्रसाद गुप्ता, संगमनेर येथील वामनराव इथापे होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालयाचे रितेश बाबुराव खेमनार, चैतन्य गोकुळ लेंडे, यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना स्वयंमसेविका पुरस्कार मुंबई येथील वाय.एम.टी.आयुर्वेद महाविद्यालयाचे श्रध्दा विमलेश पांडे, पुणे येथील टिळक आयुर्वेद महाविद्यालयाचे आकांक्षा भाउफसाहेब गुंड, संगमनेर येथील एमएचएफ होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालयाचे आराधना विश्वनाथ बोडखे, मुंबई येथील वाय.एम.टी.आयुर्वेद महाविद्यालयाचे शिवेंद्रराजे राजेंद्र यादव, पुणे येथील एलएमएफ होमिओपॅथीक महाविद्यालयाचे अभिषेक रामदास नाईकवाडी, संगमनेर येथील एमएचएफ होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालयाचे ऋषिकेश प्रकाश शिंदे, संभाजीनगर येथील छत्रपती शाहू महाराज आयुर्वेद महाविद्यालयाचे धनंजय दत्तात्रय मडके यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम रुपये दोन हजार बक्षीस म्हणून देण्यात देण्यात आले आहे.
उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक पुरस्कार रत्नागिरी येथील एमईएस आयुर्वेद महाविद्यालयाचे डॉ. अमित अशोक पाटील, सांगली येथील गुलाबराव पाटील होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. जिनेश्वर यलीगौडा, जळगाव येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे डॉ. राजेश शिवाजीराव कोलारकर, संभाजीनगर येथील छत्रपती शाहू महाराज आयुर्वेद महाविद्यालयाचे डॉ. बाळासाहेब दिगंबरराव धर्माधिकारी यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम रुपये पाच हजार बक्षीस म्हणून देण्यात आले आहे.
उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना एकक पुरस्कार सांगली येथील गुलाबराव पाटील होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालयास सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम रुपये दहा हजार बक्षीस म्हणून देण्यात आले आहे.
उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाचे वैदेही विनय काळे यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम रुपये तीन हजार बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाचे वैदेही विनय काळे, नाशिकचे के. बी. एच.दंत महाविद्यालयाचे रुगवेदा प्रशांत देशमुख, संगमनेर येथील पी.एम.टी.आयुर्वेद महाविद्यालयाचे गितांजली आप्पासाहेब मडके, सातारा येथील सावकार होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रतिक्षा भैयासाहेब पवार, मुंबई येथील श्रीमती सुनंदा प्रविण गंभीरचंद कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे वैष्णवी महेंद्र वेंद्रे, नाशिक येथील मोतीवाला भौतिकोपचार वैद्यकीय महाविद्यालयाचे आकांक्षा जयकुमार भंडारी यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम रुपये तीन हजार बक्षीस म्हणून देण्यात आले आहे.
उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार नांदेड येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे डॉ. संदिप विष्णु बिनोरकर, मुंबई येथील पी.डी. हिंदुजा कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे प्रो. मृणाल प्रशांत चव्हाण यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम रुपये पाच हजार बक्षीस म्हणून देण्यात आले आहे.
क्रीडा व आविष्कार मधील विशेष पुरस्कारात पुणे येथील संचेती ऑफ फिजीओथेरेपी महाविद्यालयाचे सामिया मिश्री, पुणे येथील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे कल्याणी जोशी व इगतपुरी येथील एस.एम.बी.टी. वैद्यकीय महाविद्यालयातील मिनाक्षी उत्तम गावडे यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. तसेच विशेष सांस्कृतिक पुरस्कारात माटुंगाचे श्रीमती सुनंदा प्रविण गंभिरचंद नर्सिंग कॉलेजची रोशनी वलउल्लाह मोहम्मद, कोडोलीचे यशवंत आयुर्वेद महाविद्यालयाची केतकी बेडेकर, लातूरचे विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाचा देवेश देशपांडे, जळगांवचे शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे डॉ. राजेश कोलारकर, माटुंगाचे श्रीमती सुनंदा प्रविण गंभिरचंद नर्सिंग कॉलेजची नम्रता चोपडेकर, नांदेडचे रुरल दंत महाविद्यालय गुंजन शिरभाते यांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवातील खेळाडू नाशिकची मोतिवाला होमिओपॅथी महाविद्यालयाची विद्यार्थीनी श्रृती अरविंद राठी, सोलापूरची अश्विन ग्रामिण वैद्यकीय महाविद्यालयाची ईश्वरी राहुल गणबोटे, मुंबईचे वाय.एम.टी. आयुर्वेद महाविद्यालयाची वैभवी सतिष पालकर व बुलढाण्याचे ए.एस.पी.एम. आयुर्वेद महाविद्यालयाची प्रेरणा बजरंग पवार यांचे पदक व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी नीट परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी डॉ. यश कुमार जैन यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांकरीता ‘डिजिटल प्लॅटफॉर्म ऑफ अॅल्युमिनी असोसिएशन’ च्या अधिकृत संकेतस्थाळाचे व बोधचिन्हाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याकरीता विद्यापीठाचे विधी अधिकारी अॅड. संदीप कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला. विद्यापीठाच्या ‘दिशा’ उपक्रमाकरीता महत्वपूर्ण व मेडिकल कम्युनिटीसाठी सोशल नेटवर्कींग प्लॅटफॉर्मला सपोर्ट करणारे ‘कनेक्टोरा’ अॅपचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
नर्सिंग विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांकरीता विद्यापीठातर्फे ‘डिजिटल हेल्थ फाऊंडेशन अभ्यासक्रम’ सुरु करण्यात आला असून विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक मेडिकल रेकॉर्ड्स, हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम्स, टेलीनर्सिंग आणि आयुष्मान भारत डिजिटल मिशन यांसारख्या मूलभूत डिजिटल आरोग्य संकल्पना आणि तंत्रज्ञानांशी परिचित करून देणारा आहे. नर्सिंग विद्याशाखेतील विद्यार्थ्यांना आवश्यक डिजिटल ज्ञान आणि कौशल्ये विकसित करण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि कोइटा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डिजिटल हेल्थ फाउंडेशन अभ्यासक्रम’ कार्यान्वीत करण्यात आला आहे. राज्यातील सुमारे 325 परिचारिका महाविद्यालयांतील दहा हजाराहून अधिक विद्यार्थी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या ई-प्रबोधिनी शिक्षण व्यवस्थापन प्रणालीद्वारे ‘डिजिटल हेल्थ फाउंडेशन अभ्यासक्रम’ हा कोर्स करु शकतील. डिजिटल नवकल्पना आरोग्यसेवेतील गुणवत्ता, उपलब्धता आणि कार्यक्षमता वृध्दींगत करण्यासाठी विद्यापीठाचा डिजिटल हेल्थ फाऊंडेशन अभ्यासक्रम महत्वपूर्ण ठरणार आहे. यावेळी या डिजिटल अभ्यासक्रमासाठी कार्य केलेल्या लेफ्टनंट कर्नल मनोमनी, ब्रिग. पुनिता शर्मा, ब्रिग. गीता एस., कर्नल एलिझााबेथ वारघेस, ब्रिग. वंदना अग्नीहोत्री, डॉ. श्रीलेखा राजेश, डॉ. मृणाल चव्हाण, कर्नल जिल्मी जोस, मेजर मर्सी जॅकब, ब्रिग. लिना कुमारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास विद्यापीठ प्राधिकरण सदस्य, विविध क्षेत्रातील व्यक्ती, विद्यार्थी, शिक्षक, पालक, विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.