देवगिरी महाविद्यालयामध्ये उद्योजकता जागृती कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न

देवगिरी महाविद्यालय आणि कुबेर सोल्युशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित देवगिरी महाविद्यालय आणि कुबेर सोल्युशन छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजकता जागृती कार्यक्रम हा आयोजित करण्यात आला होता. सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉलेजचे प्राचार्य प्राध्यापक अशोक तेजनकर हे होते. प्रमुख मार्गदर्शक उपप्राचार्य विष्णू पाटील, विभाग प्रमुख डॉ राजेश लहाने विभाग प्रमुख तथा समन्वय पदवीधर विभाग डॉ संजय रत्नपारखे, कुबेर सोल्युशन चे संचालक अनिल गावडे मार्गदर्शिका रिनल जमणारे व गौरव गिरी उपस्थित होते.

महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक अशोक तेजनकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना असे सांगितले की, “विद्यार्थ्यांनी फक्त नोकरीकडे न वळता स्वतःचा व्यवसाय अथवा उद्योग चालू करावा तसेच शासनाच्या विविध आर्थिक मदत केंद्र असून सदरील मदत केंद्रात मार्फत नवीन उद्योजकास अर्थसहाय्य मिळते तसेच सबसिडी सुद्धा मिळतो आणि विद्यार्थी स्वयंरोजगार स्वतः तयार करू शकतो” असे मार्गदर्शन केले. 

महाविद्यालयाचे उपप्राचार्य विष्णू पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना सांगितले की “देवगिरी महाविद्यालय हे उद्योजकता विकासासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवत असते” त्यामध्ये विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणे सहभागी होण्यासाठी आव्हान केले व यातून उद्योजक घडावेत आणि समाजामध्ये तसेच देशांमध्ये याचा फायदा व्हावा तसेच रोजगाराच्या अजून संधी उपलब्ध होतील अशी अशा व्यक्त केले.

Advertisement

वाणिज्य विभाग प्रमुख डॉ राजेश लहाने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांचे वैयक्तिक जीवनामध्ये त्यांनी कशाप्रकारे व्यवसायातून फायदा करता येतो तसेच विद्यार्थ्यांनी शिकत असताना सुद्धा छोटे छोटे व्यवसाय करावेत व त्यातून आपले उत्पन्न कसे वाढवता येईल यासाठी प्रयत्न करावेत, छोटे छोटे उद्योगांमधूनच मोठा उद्योजक बनत असतो असे सांगितले.

या पूर्ण वर्कशॉप चे असे मार्गदर्शन प्रशिक्षक रिनल जमणारे यांनी विद्यार्थ्यांना उद्योजक होण्यासाठी कोणत्या कोणत्या रजिस्ट्रेशन ची आवश्यकता आहे, त्यातून उद्योजक कसा उभा करू शकतो, आपली छोटीशी कल्पना आपण त्याला आपल्या उद्योजकांमध्ये कसे वापरले जाऊ शकते, यासाठी कोणत्या कोणत्या संस्था आपल्याला लोन देऊ शकतात किंवा आर्थिक सहाय्य करतात, आपण आपल्या व्यवसायाचा प्रोजेक्ट रिपोर्ट कसा बनवायचा, त्यासाठी आवश्यक असलेली जागा कुठे आणि कशी निवडायची, त्याची मार्केटिंग कशी करावी, ऑनलाइन मार्केटिंगच्या पद्धती कशा आहेत यावर मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमासाठी १०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. या संपूर्ण विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल NIESBUD भारत सरकारचे प्रमाणपत्र देण्यात आले.

 डॉ संजय रत्नपारखे समन्वयक पदव्युत्तर विभाग यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. व हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे योगदान दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page