डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे डॉ.प्रमोद येवले यांच्या कुलगुरुपदाची चतुर्थ वर्षपूर्ती

शैक्षणिक गुणवत्ता, आर्थिक शिस्त, पारदर्शक कारभार व गतीमान प्रशासन ही कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या चार वर्षाच्या कारकिर्दीची चतुःसुत्री राहिली. तसेच ‘कोविड लॅब’सह अनेक उपक्रम राबवून त्यांनी सामाजिक बांधिलकीचीही जोपासना केली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची सुत्रे डॉ.प्रमोद येवले यांनी १६ जुलै २०१९ रोजी स्विकारली. कुलगुरुपदाच्या त्यांच्या कारकिर्दीस रविवारी (दि.१६) चार वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने त्यांच्या कारकिर्दीच्या लेखाजोखा, या काळातील महत्वपूर्ण घटना-घडामोडी,

निर्णय पुढीलप्रमाणे –

  • पहिल्याच स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात डॉ.येवले यांनी ध्वजारोहणची केवळ जागाच बदलली असे नव्हे तर प्रशासनाची सुत्रे बदलण्याचे संकेत दिले.
  • प्रशासनात गतिमानता व पादरदर्शकता आणण्यासाठी फाईल ट्रँकिंग सिस्टीम सुरु केली. विद्यापीठाच्या सर्व फाईल आता ‘ऑनलाईन’ पध्दतीनेच यशस्वीपणे मार्गी लागत आहेत.
  • वर्षभरातच दोन दीक्षांत सोहळे यशस्वीपणे घेण्यात आले. चार वर्षात एकुण पाच दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले.
  • संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात आली.
  • पदवीचे शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना विद्यापीठाचा परिसराची गोडी लागवी म्हणून जाणीवपूर्वक विद्यापीठात परिसरात युवक महोत्सवाचे आयोजन केले. तर यंदापासून मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी युवक महोत्सवाचा समावेश होणार आहे.
  • दोन ‘कोविड टेस्टिंग लॅब’ उभा करणारे एकमेव विद्यापीठ ठरले. या संदर्भातील महत्वपूर्ण असा ‘व्हायरॉलॉजी’ हा अभ्यासक्रम सुरु केला.
  • पीएच.डी’चे सपुर्ण प्रवेश प्रक्रिया ‘ऑनलाईन करण्यात आली. आजघडीला ४ हजार ८०० विद्यार्थी संशोधन करीत असून १ हजार ९७५ विद्यार्थ्यांना ‘रिसर्च फेलोशिप’ प्राप्त झालेली आहे.
  • कोविड काळात विद्यापीठ निधी, शिक्षक कर्मचारी वेतनाजून जवळपास सव्वा कोटींचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात आला.
  • महाविद्यालयांची संलग्नता पासून ते शिक्षक भरती जाहिरात संपूर्ण प्रक्रिया ‘ऑनलाईन’ करण्यात आली.
  • प्राध्यापकांसाठी ‘मायनर रिसर्च प्रोजक्ट’ अंतर्गत ३३ प्रकल्पांची निवड करुन ४२ लाखांचा निधी दिला.
  • विद्यापीठ ‘आयपीआर सेल’ अंतर्गत चार वर्षात १० पेटंटस व १० कॉपीटाईसची नोंदणी करण्यात आली. स्वतः कुलगुरु यांनाही या काळात तीन पेटंटस् मिळविले.
  • पदव्यूत्तर व व्यावसायिक ‘ऑनलाईन’ मुलाकंन सुरु केले. तसेच कोविड काळात ऑनलाईन परीक्षा व निकाल यशस्वीपणे राबविण्यात आले.
  • तीन टप्प्यात मिळून ३९१ महाविद्यालयांचे ‘अ‍ॅकडमिक ऑडीट’ करण्यात आले.
  • अखिल भारती कॉमर्स काँग्रेस, पश्चिम विभागीय कुलगुरु परिषद, राज्य क्रीडा महोत्सव, जी-२० समीट लेक्चर सिरीज चे यशस्वी आयोजन.
  •  छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुताळयाीच उभारणी केली. विद्यापीठ गेटचे सुशोभीकरण करुन नामांतर शहित स्मारकाचीही पायाभरणी करण्यात आली.
  • साडे आठ कोटी रुपये खर्चुन सिंधेटिक ट्रॅक उभारणीचे काम सुरु करण्यात आले.
  • अटल इन्क्युबूशन सेंटर अंतर्गत ४६ स्टार्टअपची नोंदणी. साडे आठ कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला.
  • विद्यापीठ निधीतून कंत्राटी व तासिका तत्वावर प्राध्यापक भरती करण्यात आली.
  • एम.फार्मसी, आर्टिफिशिएल इंटेलिजिएन्स, फॉरेन्सिक सायन्य आदी नवीन विभाग सुरु करण्यात आले.

विदेशी विद्यार्थी वसतीगृह, विधि विभाग, पॉल हर्बट रिर्सच सेंटर सह नवीन इमारतींचे उद्घाटन करण्यात आले. या प्रमाणे विद्यापीठ प्रगतीच्या दिशेने चार पावले पुढे गेला. आगामी शैक्षणिक वर्षातही वेळापत्रकाचे काटेकोर पालक करुन ‘डिसेंबर’मध्ये दीक्षांम समारंभ, सप्टेंबर महिन्यात युवक महोत्सवाचे आयोजन कुलगरु डॉ.प्रमोद येवले यांनी केले आहे.

Advertisement

दीक्षाभूमी ते शिक्षाभूमी’ प्रवास आनंददायी : कुलगुरू

माझ्या चार दशकांच्या शैक्षणिक कारकिर्दीतील चार वर्षे औरंगाबाद येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या विद्यापीठात मनासारखे काम करता आले याचा आनंद आहे. पहिल्या पिढीचे पदवीधर घडविणारे व वंचित , कष्टकरी व शेतकरी कुटुंबातून आलेल्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणणारे म्हणून आपले विद्यापीठ ओळखले जाते. बाबासाहेबांनी औरंगाबादला शिक्षाभूमी तर नागपूरला दीक्षाभूमी ही ओळख करून दिली. त्यांच्याच आशीर्वादामुळे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेता आले . उर्वरित कार्यकाळातही विद्यापीठाचा नावलौकिक उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे , अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी व्यक्त केली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page