गोंडवाना विद्यापीठात “संत तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील सामाजिकता” विषयावर व्याख्यान संपन्न

संत तुकारामांचे विचार समाजासाठी प्रेरणादायी – डॉ नरेंद्र आरेकर

निबंध स्पर्धेतील विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण

गडचिरोली : संतांचे जन्म आणि कर्मस्थळ असणारा महाराष्ट्र, संतांची भुमी म्हणून ओळखला जातो. तुकारामांनी भक्ती, साहीत्य व अंभगाद्वारे समाजात जनजागृती निर्माण करण्याचे कार्य केले. अंधश्रद्धा, नितीमुल्ये, वैज्ञानिक दृष्टीकोन आदी विषयांचा उहापोह तुकारामांनी अभंगगाथेतून केला. तसेच अनेक अभंगातून प्रयत्नवाद व आशावादाचा पुरस्कार केला आहे. त्यांचे विचार परखड स्वरुपाचे असून समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन प्रा डॉ नरेंद्र आरेकर यांनी केले.

निबंध स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण आणि “संत तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील सामाजिकता” या विषयावर गोंडवाना विद्यापीठ सभागृहात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाला प्रमुख वक्ता म्हणून कुरखेडा येथील गो मुनघाटे कला, विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख प्रा डॉ नरेंद्र आरेकर, अध्यासन केंद्राचे प्रमुख डॉ हेमराज निखाडे, प्रा डॉ धनराज पाटील, डॉ प्रीती पाटील, मराठी विभागाच्या सहायक प्राध्यापक डॉ सविता गोविंदवार तसेच विद्यापीठातील शिक्षक, शिक्षकेत्तर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

मागदर्शन करतांना प्रा डॉ नरेंद्र आरेकर म्हणाले, धार्मिक संप्रदाय, पंथ आणि संत यांचा विचारांचा प्रभाव कमी झालेला नाही. संताचे विचार आजही आहे. संताचे विचार मागे पडले नसून त्यांच्या विचारांचे सामर्थ्य लक्षात घेणे गरजेचे आहे. तसेच धर्म आणि श्रद्धा यांचा अनन्यसंबध आहे, तो भक्तीच्या मार्गाने ‍सिद्ध होतो. जनता अधंश्रद्धेच्या मार्गाने जाणार नाही याची खबरदारी तुकारामांसह सर्व संतांनी घेतली. तुकारामांचा जनकल्याणाचा कळवळा कोरडा नव्हता तर त्याला कृतीचा सुगंध होता. जनसामान्यापासून अज्ञगण आजही तुकारामांचे अभंग गातात. तुकारामांचे विचार हे समाजातील अनेक वर्गांसाठी प्रेरणादायी असल्याचे डॉ आरेकर म्हणाले.

Advertisement

आपण जन्माला आलो, तर व्यक्ती म्हणून समाजाचे काही देणे लागतो. आपल्या कार्याचा उपयोग समाजासाठी व्हायला पाहीजे, हे एकदंरीत सतांच्या जीवनकार्यातून शिकायला मिळते, असे सहायक प्राध्यापक डॉ सविता गोविंदवार म्हणाल्या.

प्रास्ताविकेत बोलतांना, संत तुकाराम महाराज अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ हेमराज निखाडे म्हणाले, गोंडवाना विद्यापीठ परीक्षेत्रातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून संत तुकाराम महाराज यांच्या जीवनावर आधारित निबंध मागविण्यात आले होते. त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकता यावा. त्यांचे विचार तळागळातील नागरीकांसह, विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावेत हा दृष्टीकोन ठेवून सदर स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये 18 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

पाहूण्यांचा परिचय मराठी विभागातील सहायक प्राध्यापक डॉ सविता गोविंदवार यांनी करून दिला. तत्पूर्वी, मान्यवरांच्या हस्ते संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.

मान्यवरांच्या हस्ते निबंध स्पर्धेतील विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण :

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्यावर आधारित विद्यापीठस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त ब्रम्हपूरी येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयाची विद्यार्थीनी स्नेहा विलास बनपुरकर हिला रोख रु 4 हजार, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक प्राप्त गोंडवाना विद्यापीठाच्या पीजीटीडी कॉमर्स विभागाची विद्यार्थीनी हिमाद्री भूपती गाईन हिला रोख रु 3 हजार, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह तसेच तृतीय क्रमांक प्राप्त चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयाचा विद्यार्थी साहिल हस्तक झाडे यास रोख रु 2 हजार, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

त्यासोबतच, प्रोत्साहनपर बक्षिसांमध्ये गोंडवाना विद्यापीठाच्या पीजीटीडी इतिहास विभागाची विद्यार्थिनी सायली मधुकर पालथिया, नवरगाव येथील ज्ञानेश महाविद्यालयाची विद्यार्थिनी डेझी निखारे तसेच चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयाचा विद्यार्थी विशाल आनंदराव निकोडे यांना संत तुकारामाची चरित्रगंगा व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page