नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागात “गांधी ॲज अ कम्युनिकेटर” विषयावर परिसंवाद संपन्न

गांधींपासून पत्रकारांनी प्रामाणिकपणा आत्मसात करावा – अधिष्ठाता डॉ‌ प्रशांत कडू यांचे प्रतिपादन

नागपूर : पत्रकारांनी महात्मा गांधींच्या जीवनातील सत्य, तळमळ, प्रामाणिकपणा आणि समाजसेवा ही मूलभूत मूल्ये आत्मसात केली पाहिजेत, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ प्रशांत कडू यांनी केले. महात्मा गांधी जयंतीनिमित्त विद्यापीठ पदव्युत्तर जनसंवाद विभागात आयोजित परिसंवादात ते बोलत होते. विभाग प्रमुख डॉ मोईज मन्नान हक यांनी प्रास्ताविक केले.

Advertisement
जनसंवाद विभागात गांधी जयंती निनित्त बोलतांना अधिष्ठाता डॉ प्रशांत कडू.

महात्मा गांधी यांनी लंडन-आधारित ‘द व्हेजिटेरियन’साठी लेख लिहिले आणि नंतर १९०३ पासून त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील “इंडियन ओपिनियन” मध्ये योगदान दिले, असे अधिष्ठाता डॉ कडू यांनी १८८८ पासून गांधींच्या पत्रकारितेच्या कार्याचा शोध घेतला नंतर पुढे बोलताना सांगितले. महात्मा गांधीजींची वैयक्तिक मूल्ये आणि तत्त्वे आणि त्यावेळचे त्यांचे ध्येय या लिखाणातून कसे प्रतिबिंबित होते यावर त्यांनी विद्यार्थ्यांना प्रबोधन केले.

भारतात परतल्यावर ते “यंग इंडिया” आणि “नवजीवन” चे संपादक झाले. त्यांनी राजकारण आणि सामाजिक परिवर्तनावर लक्ष केंद्रित केले. डॉ कडू यांनी आठवण करून दिली की १९३३ मध्ये त्यांनी “हरिजन” हे वृत्तपत्र सुरू केले. ज्यामध्ये त्यांनी अस्पृश्यता आणि ग्रामीण विकास यासारखे मुद्दे मांडले. सेमिनारला विभागातील विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page